नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती सध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.
भारताचे राष्ट्रपती दरवर्षी काही लोकांना विविध प्रकारचे पुरस्कार देऊन सन्मानित करतात. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की, हे पुरस्कार कोणते? हे पुरस्कार का दिले जातात? आजच्या या लेखात आपण भारतात दिल्या जाणार्या विविध नागरी पुरस्कारांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तसेच सर्वोच नागरी पुरस्कार कोणता हे देखील जाणून घेणार आहोत.
भारतरत्न : भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा पुरस्कार अशा भारतीयांना दिला जातो ज्यांनी आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून संपूर्ण जगात भारताचा नावलौकिक मिळवला आहे. भारतरत्न हा पुरस्कार फार कमी लोकांना दिला जातो. क्रीडा, साहित्य, विज्ञान, सामाजिक कार्य, कला आणि इतर सर्वच क्षेत्रात विशेष काही केल्यावरच हा पुरस्कार दिला जातो. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणे ही मोठी गोष्ट आहे.
हा पुरस्कार प्रथम 1954 साली डॉ. श्री सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि डॉ. चंद्रशेखर वेंकटरामन यांना देण्यात आला. त्यांच्याशिवाय भारताच्या महान परिचारिका मदर तेरेसा, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष नेल्सन मंडेला, भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे.
पद्मविभूषण : पद्मविभूषण हा भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा पुरस्कार एखाद्याच्या आयुष्यात मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. या पुरस्काराची सुरुवातही १९५४ साली झाली. व्हीके मेनन, नंदलाल बोस यांसारख्या व्यक्तिमत्त्वांना हा पुरस्कार प्रथम देण्यात आला. अलीकडेच मेरी कोम, पीव्ही सिंधू यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या दोन्ही महिलांनी अलिकडच्या वर्षांत झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पदके मिळवून देऊन देशाचे नाव उंचावले आहे. पद्मविभूषणही त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्यावरच दिला जातो.
पद्मभूषण : पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा पुरस्कार अशा लोकांना दिला जातो ज्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे आणि भारत आणि त्यांच्या समाजाचा गौरव केला आहे. हा पुरस्कार 1953 मध्ये सुरू करण्यात आला. पद्मभूषण पुरस्कार प्रथम अमरनाथ झा, एमएस सुभलक्ष्मी यांना देण्यात आला. अलिकडच्या वर्षांत, गुलाम नबी आझाद, रशीद खान, अनिल प्रकाश जोशी यांसारख्या व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पद्मश्री : पद्मश्री पुरस्कार हा भारत देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच लोकांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाते. कोणत्याही व्यक्तीला पद्मश्री पुरस्कार मिळणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. 1954 पासून लोकांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जात आहे. पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या लोकांची यादी खूप मोठी आहे. अलीकडच्या काळात तुलसी गौडा, सायना नेहवाल, विद्या बालन यांसारख्या लोकांना हा पुरस्कार मिळाला आहे, त्यामुळे हा पुरस्कार मिळणे किती अभिमानास्पद आहे, हे तुम्हाला समजले असेलच.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.