भारतीय रेल्वेच्या राजधानी, शताब्दी, दुरंतो या गाड्यांमध्ये काय आहे फरक. जाणून घ्या काय आहेत या नावांचे महत्व?

Infomative

भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी म्हटले जाते. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. अनेकदा तिकीट काढताना गाड्यांची नावे वेगवेगळी असल्याचे आपण पाहतो. काही गाड्यांचे नाव राजधानी एक्स्प्रेस, काहींचे शताब्दी एक्स्प्रेस, तर काही रेल्वे दुरांतो एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या गाड्यांची नावे अशी का आहेत? गाड्यांची नावे कशाच्या आधारावर दिली जातात? वास्तविक, ट्रेनची नावे तीन गोष्टींच्या आधारे ठेवली जातात. राजधानी (ट्रेन विशिष्ट गरजेसाठी धावतात) , ठिकाण ( म्हणजे स्टेशनचे नाव ) आणि विशेष स्थान ( म्हणजे एखाद्या प्रसिद्ध ठिकाणावरून जाणारी रेल्वे). चला तर मग जाणून घेऊया या रेल्वेबद्दल .

राजधानी एक्स्प्रेस : 

भारतीय रेल्वेने खास सोयीसाठी काही गाड्या चालवल्या आहेत. यापैकी एका ट्रेनचे नाव राजधानी आहे. एका राज्याची राजधानी दुसऱ्या राज्याच्या राजधानीशी जोडणार्‍या रेल्वेला राजधानी एक्स्प्रेस असे नाव देण्यात येते. देशाची राजधानी दिल्ली ते इतर राज्यांची राजधानी या दरम्यान गाड्या वेगाने धावणे हा त्याचा उद्देश आहे. त्यामुळे तिचे नाव राजधानी एक्स्प्रेस ठेवण्यात आले. ही ट्रेन ताशी 140 किमी वेगाने धावते.

ठिकाण म्हणजेच स्टेशनवर आधारित नाव :

ठिकाणाच्या (स्टेशन) आधारावर या गाड्यांची नावे देण्यात आली आहेत. जे एका विशिष्ट ठिकाणाहून पुढे जातात आणि विशिष्ट ठिकाणी पोहोचतात. त्यांच्या नावावरून प्रवाशांना ही ट्रेन कुठे जाणार याची कल्पना येते. जसे-

  • हैदराबाद ते मुंबई धावणारी मुम्बई एक्सप्रेस (Mumbai Xpress)
  • हावड़ा ते कालका धावणारी कालका मेल (Kalka Mail)
  • मैसूर ते जयपुर धावणारी जयपुर एक्सप्रेस

एखाद्या प्रसिद्ध ठिकाणावरून धावणारी रेल्वे :

या अशा गाड्या आहेत ज्या विशिष्ट स्थान, राष्ट्रीय उद्यान, स्मारक, नदी, पर्वत, झोन किंवा क्षेत्रातून जातात. म्हणूनच त्या स्थानाच्या किंवा जागेच्या आधारावर त्यांची नावे ठेवण्यात आली. जसे-

  • चेन्नई ते हैदराबाद जाणारी चारमीनार एक्सप्रेस (Charminar Express)
  • जोधपुर ते इंदौर जाणारी रणथंभौर एक्सप्रेस (Ranthambore Express)
  • हैदराबाद ते हावड़ा जाणारी ईस्ट कोस्ट एक्सप्रेस (East Coast Express)
  • मंगलौर ते तिरुवनंतपुरम जाणारी मालाबार एक्सप्रेस (Malabar Express)
  • कार्बेट पार्क एक्सप्रेस, कांजीरंगा एक्सप्रेस आणि ताज एक्सप्रेस

शताब्दी एक्स्प्रेस : 

शताब्दी ट्रेन ही भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या ट्रेनपैकी एक आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त 1989 मध्ये सुरू झाल्यामुळे या ट्रेनला शताब्दी असे नाव देण्यात आले. 400 ते 800 किमीच्या प्रवासात या ट्रेनला अधिक पसंती दिली जाते. त्याचा वेग 160KM प्रति तास आहे. ह्या ट्रेनमध्ये स्लीपर कोच नाहीत, फक्त एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहेत.

दुरंतो एक्स्प्रेस :

दुरांतो हे नाव बंगाली शब्द निर्बाद म्हणजेच Restless यावरून आले आहे. प्रवास करताना ही ट्रेन कमी थांबे घेते. ही खूप लांब पल्ल्याची ट्रेन आहे. त्याचा वेग जवळपास 140 किमी आहे. ती राजधानी आणि शताब्दीपेक्षा जास्त संख्येने चालते. दुरांतोमध्ये LHB स्लीपर कोच आहेत जे सामान्य गाड्यांपेक्षा जास्त आहेत.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *